धर्माच्या नावावर पहलगाममध्ये हल्ला, असदुद्दीन ओवैसी यांचा मुस्लिमांना हा सल्ला

0

मुंबई,दि.२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam) अतिरेक्यांनी धर्म विचारून हल्ला केला. या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी देशभरातील मुस्लिमांना आवाहन केले आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मदतीसाठी आवाहन करणारा एक व्हिडिओ एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर पोस्ट केला. ते म्हणाले, ‘तुम्हा सर्वांना माहिती आहेच की पहलगाममध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी २७ हून अधिक लोकांची हत्या केली आहे आणि अनेक जखमी लोक रुग्णालयात आपल्या जीवासाठी झुंजत आहेत.'(Asaduddin Owaisi On Pahalgam)

शुक्रवारच्या नमाजला काळी पट्टी…

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘या दहशतवाद आणि क्रूरतेविरुद्ध मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की उद्या शुक्रवारच्या नमाजला जाताना हातावर काळी पट्टी बांधून जा, जेणेकरून आपण एकत्रितपणे एक बेंचमार्क देऊ शकू की आपण भारतीय परदेशी शक्तींना देशाची शांतता आणि एकता कमकुवत करू देणार नाही.’ या हल्ल्यामुळे दुष्टांना आपल्या काश्मिरी बांधवांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. मी सर्व भारतीयांना शत्रूच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन करतो.

कुत्र्यांना शिक्षा झाली पाहिजे

सर्वपक्षीय बैठकीपूर्वी ओवेसी यांचे मोठे वक्तव्य केले. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे ओवेसी म्हणाले. हल्ल्यात सहभागी असलेल्या कुत्र्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे ओवेसी म्हणाले आहेत. जे त्यांचे स्वामी आहेत. त्यांना भारत आणि काश्मीरमध्ये शांतता नको आहे. त्यांना धडा शिकवला पाहिजे. हे सर्व केवळ बोलण्यातून नव्हते तर कृतीतून दिसून यायला पाहिजे. दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी ओवेसी यांनी हैदराबादमध्ये हे वक्तव्य केले. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here