Rakesh Tikait News: शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. राकेश टिकैत हे शनिवारी दौसा जिल्ह्यात होते. दौसा येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना भाजपपेक्षाही (BJP) धोकादायक म्हटले. (Rakesh Tikait On Asaduddin Owaisi)
ओवेसींवर मोठे वक्तव्य करताना राकेश टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले की, ओवेसी हे भाजपपेक्षा धोकादायक आहेत आणि समाजात फूट पाडण्याचे काम करतात. ओवेसींसारख्या लोकांपासून जनतेने सावध राहावे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की,ओवेसीसारख्या लोकांना देशाचा बंधुभाव बिघडवायचा आहे.
शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, संपले नाही
शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राकेश टिकैत म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित केले आहे, ते संपलेले नाही. गरज पडल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरू शकतात, असेही ते म्हणाले. टिकैत म्हणाले की, सरकारसोबत करार झाला आहे, मात्र करार करताना दिलेल्या आश्वासनांवर सरकार संथ गतीने काम करत आहे. सरकारने आश्वासने पाळली नाहीत, तर पुन्हा देशात शेतकरी आंदोलन होऊ शकते, असेही ते म्हणाले.
आचारसंहितेनंतर शेतकरी निवडणुकीबाबत निर्णय घेतील : टिकैत
यादरम्यान, यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा कल कोणत्या बाजूने असेल, असे सांगताना ते म्हणाले की, आचारसंहितेनंतर शेतकरी निवडणुकांबाबत निर्णय घेतील. या वेळी राकेश टिकैत म्हणाले की, एक वर्षाच्या आंदोलनात आपल्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यास आपण मागे हटले नाही आणि यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देत राहणार. यादरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही पंजाबमधील स्फोट हे सुनियोजित कट असल्याचे वर्णन केले.