अमित शाह म्हणाले, निवडणुकीतील कमी मतदानाचा भाजपाला…

0

नवी दिल्ली,दि.14: लोकसभा निवडणूक 2024 मधील तीन टप्प्यात कमी मतदान झाले आहे. लोकसभा निवडणूक 2024 एकुण सात टप्प्यात मतदान होत आहे. 13 मेला चौथ्या टप्प्याचे मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी हा चर्चेचा विषय राहिला आहे. पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीतील मतदारांच्या अनुउत्साहचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

मात्र, सोमवारी झालेल्या चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी काहीशी चांगली झाली. परंतु, कमी मतदानाची टक्केवारी असूनही भारतीय जनता पक्षाचे कोणतेही नुकसान होत नाही, याबाबत गृहमंत्री अमित शाह यांना शंका नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले की, भाजपच्या बाजूने सकारात्मक मते पडत आहेत.

मतदानाची टक्केवारी घसरल्याने भाजपच्या 400 च्या पुढे जाण्यात अडथळे येतील, हे गृहमंत्र्यांनी फेटाळून लावले. कमी मतदानाची टक्केवारी हा आमच्यासाठी नव्हे तर विरोधकांसाठी चिंतेचा विषय असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. 

4 थ्या टप्प्यात मतदानात वाढ

सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात मागील टप्प्यांच्या तुलनेत किंचित वाढ झाली आणि 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 96 मतदारसंघांमध्ये 67 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12 ते 12 वाजेपर्यंत 67.25 टक्के मतदान झाले असले तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील या टप्प्याच्या तुलनेत ही मतदानाची टक्केवारी अजूनही कमी आहे.

सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के मतदान झाले होते, दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के मतदान झाले होते.

2019 vs 2024 मतदानाची टक्केवारी 

लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 65.5 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 66.00 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्यात 67.25 टक्के मतदान झाले. 2019 च्या तुलनेत यावेळी चारही टप्प्यात कमी मतदान झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 69.96 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 70.09 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 66.89 टक्के आणि चौथ्या टप्प्यात 69.1 टक्के मतदान झाले होते. 

अमित शाहांचा दावा

मतदानाची टक्केवारी कमी असल्याने भाजपचे कोणतेही नुकसान होत नसल्याचा दावा अमित शाह करत आहेत. उलट विरोधकांनाच तोटा सहन करावा लागणार असल्याचे ते सांगत आहेत. केंद्रीय मंत्री म्हणाले, “निश्चितपणे एनडीए 400 जागा पार करणार आहे. यात कोणतेही जर-तर नाही. मतदानाची टक्केवारी कमी होणे हा आपल्यासाठी नव्हे तर विरोधकांसाठी चिंतेचा विषय असायला हवा. हे मी भाजप कार्यकर्त्यांशी केलेल्या संभाषणानंतर हे सांगतोय.” 

अमित शहा म्हणतात, “भाजप समर्थकांनी सर्वाधिक मतदान केले आहे. लोक विरोधकांबद्दल उत्साही नाहीत, तर ते आमच्याबद्दल उत्साही आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसेल, आमचे विजयाचे अंतर आणि जागा दोन्ही वाढतील. अनुपस्थितीबद्दल बोलायचे झाले तर. एक लहर आहे, मी तुम्हाला सांगतो की, मी अगदी लहान असताना 1975 पासून निवडणुका पाहत आलो आहे, की डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या योजनांबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे 60 कोटींहून अधिक लाभार्थींची फौज मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याने भाजपचा विजय निश्चित होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here