नागपूर,दि.26: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मराठा समाजाने आंदोलन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काल (दि.25) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईकडे सागर बंगल्यासमोर उपोषण करायला निघालेले मनोज जरांगे आज (दि.26) अंतरवाली सराटीत परत आले. त्यांनी आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच मराठा समाजाने नागपुरात मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. मनोज जरांगे यांचा पुतळा देखील जाळण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर अभद्र अणि खालच्या पातळीवर टीपणी केल्याचा निषेध करत मराठा समाजाने नागपुरात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यांचा पुतळा जाळण्यात आला. ZEE 24 ने याबाबत वृत्त दिले आहे.

ZEE 24 ने दिलेल्या वृत्तानुसार नागपुरातील मराठा समाज महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी हे निषेध आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगेने फडणवीस यांच्यावर खोटे गैर कायदेशीर आरोप करत असल्याचा नागपुरातील मराठा समाजाचा आरोप आहे. यामुळे मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच पोहचली याच्या निषेधार्थ हे निषेध आंदोलन असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले.