मुंबई,दि.२: New Guidelines: कोरानाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. कोरानाची तिसरी लाट (कविद Third Wave) ओसरत आहे. अनेक जिल्ह्यात रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. राज्य सरकारने करोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर करत राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र मनोरंजन स्थळे आणि पर्यटन तसेच धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.
राज्यातील या १४ जिल्ह्यांमध्ये होणार सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेने सुरू
मुंबई शहर
मुंबई उपनगरे
पुणे
भंडारा
सिंधुदुर्ग
नागपूर
रायगड
वर्धा
रत्नागिरी
सातारा
सांगली
गोंदिया
चंद्रपूर
कोल्हापूर