इंदूर,दि.16: Vaishali Thakkar Suicide: टीव्ही अभिनेत्री अभिनेत्री वैशाली ठक्करने (Vaishali Thakkar) आत्महत्या केली आहे. स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये संजनाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहिली आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील महिपालपूर येथे राहणारी वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. प्राथमिक तपासात तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या अँगलने तपास सुरू केला आहे. वैशालीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये वैशालीने संजनाची भूमिका साकारली होती. यानंतर वैशाली ‘ये वादा रहा’, ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’ आणि ‘विष-अमृत’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.