भरधाव कारने 15 जणांना चिरडले, 1 ठार, 6 जणांची प्रकृती गंभीर

0

नवी दिल्ली,दि.14: पूर्व दिल्लीतील गाझीपूरमध्ये बुधवारी रात्री एका कारने 15 हून अधिक लोकांना चिरडले. बुधबाजार ते मयूर विहार फेज 3 पर्यंत दारूच्या नशेत एका टॅक्सी चालकाने 15 हून अधिक लोकांना चिरडले, त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत कारचाही चक्काचूर झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांमध्ये 4 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. मात्र, यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात खोडा कॉलनीत राहणाऱ्या 22 वर्षीय सीता देवी यांचा मृत्यू झाला आहे. 

घटनेनंतर लगेचच आजूबाजूच्या लोकांनी चालकाला पकडून गाझीपूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. जखमींना तातडीने जवळच्या लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांविरोधात गोंधळ घातला आणि रास्ता रोकोही केला. यानंतर पोलिसांनी सौम्य बळाच्या मदतीने सर्वांना घटनास्थळावरून हाकलून दिले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here