सोलापूर,दि.११: पाकिस्तानने भारताला पोकळ धमकी दिली आहे. पाक म्हणाला रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत युद्ध करू. 10 मे रोजी भारत-पाकिस्तानमध्ये शस्रसंधीसंदर्भात चर्चा झाल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने शस्रसंधीचं उल्लंघन करत पुन्हा हल्ले सुरु केला. भारताकडे युद्धबंदीची विनंती करणे आणि नंतर ती मोडणे. ही पाकिस्तानची जुनी सवय झाली आहे. तथापि, पाकिस्तान आपल्या चुकांपासून थांबत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या विधानात ही निराशा स्पष्टपणे दिसून येते. (Shehbaz Sharif On India Marathi News)
शनिवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात शाहबाज शरीफ म्हणाले की, भारताने अलीकडे जे केले ते चुकीचे होते, ज्याला आपल्या सैन्याने योग्य उत्तर दिले. पहलगाम हल्ल्याचे निमित्त वापरून भारताने आपल्यावर युद्ध लादले. (Shehbaz Sharif On India)
शरीफ म्हणाले की, भारताने पहलगामचा वापर निमित्त म्हणून करून युद्ध लादले, परंतु आम्ही स्पष्ट केले की आता ही बैठक युद्धभूमीवर होईल. भारताच्या निराधार आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची ऑफर पाकिस्तानने पुन्हा एकदा दिली.

भारतावर निराधार आरोप | Shehbaz Sharif On India Marathi News
भारताने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप शाहबाज यांनी केला. भारताने निवासी भागांवर हल्ला करून आमच्या संयमाची परीक्षा घेतली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी छावण्या आणि दारूगोळा डेपोंना लक्ष्य करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.
युद्धबंदीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
युद्धबंदीसाठी शाहबाज शरीफ यांनी चीन, डोनाल्ड ट्रम्प आणि आखाती देशांचे आभार मानले. शाहबाज म्हणाले- मी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. युद्धबंदीत ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धबंदीसाठी शाहबाज यांनी सौदी अरेबिया, यूएई, तुर्की आणि कतारचे आभार मानले.