Russia-Ukraine War: युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले, रशियन रणगाडे रोखण्यासाठी ढाल बनवून उपयोग: रशियाचा दावा

0

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) बुधवारी रात्री रशियाचे अध्यक्ष पुतीन (President Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत असल्याचा दावा केला, मात्र युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना बंधक बनवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. पीएम मोदी आणि पुतिन यांच्यातील चर्चेनंतर लगेचच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.

कीव आणि खार्किवमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आमचे लष्कर मदत करत आहे, मात्र युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे, असे रशियन संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. युक्रेन आता भारतीय विद्यार्थ्यांना ढाल बनवून उपयोग करत असल्याचा दावा रशियाने केला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना तिथे बंधक बनवण्यात आले आहे. खार्किवमधून भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रशियाने सांगितले.

दरम्यान, रशियाच्या दाव्यानंतर युक्रेनकडूनही मोठे वक्तव्य समोर आले आहे. युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ट्विट करून, त्यांनी भारतासह त्या देशांना त्यांच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याबाबत रशियाशी बोलण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनने भारत, पाकिस्तान, चीन यांना रशियाच्या आक्रमकतेमुळे खार्किव आणि सुमी येथे अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर तयार करण्याबाबत रशियाशी बोलण्याचे आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रशियाने मदत करावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली होती. त्याचवेळी रशियाने याप्रकरणी युक्रेनवर गंभीर आरोप केले. रशियाकडून सांगण्यात आले की, जे रणगाडे थांबवले जात आहेत, त्यात फक्त भारतीय विद्यार्थ्यांनाच ढाल बनवले जात आहे.

त्याच वेळी, बेलारूसच्या राजदूताने यूएनमध्ये दावा केला की पोलंडमध्ये सीमा रक्षकांनी सुमारे 100 भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांना युक्रेनला परत पाठवले. युक्रेनमधून आतापर्यंत 17 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत पीएम मोदींनी बुधवारी रात्री पुतीन यांच्याशी चर्चा केली. कारण भारतीय विद्यार्थी अजूनही खार्किवात अडकले आहेत. युद्धादरम्यान पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी पुतीन यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा आग्रह धरला. यावेळीही पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here