निकालापूर्वीच काँग्रेसने केला जल्लोष, राम सातपुते म्हणाले…

0

सोलापूर,दि.८: मागील दोन निवडणुकीत निकालापूर्वीच काँग्रेसने जल्लोष  केला होता. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता आणि आताही त्यांनी जल्लोष केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे असे सांगत  जनतेचा कौल यंदाही भाजपलाच मिळाला असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.

मंगळवारी, आमदार सातपुते यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व नेते आणि या निवडणुकीत दिवस रात्र परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. सोलापुराकरांचा कौल भाजपला आहे. भाजपचा हा बालेकिल्ला अवैध राहील असा विश्वासही आमदार सातपुते यांनी व्यक्त केला.

निवडणूक म्हटले की घोषणाबाजी होणार, पोलिंग बूथवर हरकतीचे मुद्दे उपस्थित होतात. हे गृहीत धरून चालावे लागते, असे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला उत्तर देताना सांगितले.

या पत्रकार परिषदेस आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे प्रदेश सदस्य शहाजी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here