दि.22: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका निनावी फोन कॉलने त्यांना धमकी देण्यात आल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, त्यांना धमकीचा फोन कॉल राजस्थानमधून आला होता.
समीर वानखेडे हे चांगले काम करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका आणि टार्गेट करु नका असंही धमकावणाऱ्याने म्हटल्यांचं बोललं जात आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
बॉलिवूडमधून समोर आलेलं ड्रग्ज कनेक्शन तसेच मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक एनसीबीवर सातत्याने आरोप करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप करत आहेत. तसेच एनसीबीचे झोनल चीफ समीनर वानखेडे आणि त्याच्या परिवारावर सुद्धा नवाब मलिक आरोप करत आहेत.