मराठा आरक्षणावरून संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा आरोप

0

मुंबई,दि.28: मराठा आरक्षणावरून संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाची प्रत मनोज जरांगे यांना दिली. जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला असल्याचे सांगितले गेले.

दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप

अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले तर छगन भुजबळ, ॲड. गुणरत्न सदावर्ते व ओबीसी नेत्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे मराठा आरक्षणावरून दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. सरकारला मुळात 57 लाख नोंदी सापडल्याचं नसल्याचे आखरे म्हणाले.

57 लाख नोंदी सापडल्याचं नाही

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन हा अध्यादेश काढण्यात आल्याचे मनोज आखरे म्हणाले. ‘हा संपूर्ण प्रकार चुकीचा आहे. सरकारला मुळात 57 लाख नोंदी सापडल्याचं नाही. त्यामुळे शासनाने मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपर्यंत जे काही बोलले ते सर्व धादांत खोट आहे.’ असा आरोप आखरे यांनी केला आहे.

‘मराठा आणि कुणबी हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होतोय. सगेसोयरे याचे स्पष्टीकरण द्यावे, शासनाने तोंडाला पाने पुसली आहेत. हेतू पुरस्कर मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी अद्याप अपूर्णच आहे.’ असे मनोज आखरे म्हणाले.

‘पितृसत्ताक सोबत मातृसत्ताक विवाह आरक्षणाचा लाभ देताना ग्राह्य धरावे. मनोज जरांगे यांची दिशाभूल होत असल्याचं त्यांना कळाल नसेल. भुजबळांना जर सामाजिक जाण असती तर त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलं नसतं. देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा म्हणून भुजबळ काम करत आहेत. भुजबळांनी दोन जातीत तेढ निर्माण करून भांडण लावण्याचं काम केलं.’ असे आखरे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here