Uddhav Thackeray On Ajit Pawar | ‘सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल तर कुणी…’: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: आजच शिवसेना वंचित युतीची घोषणा करण्यात आली आहे

0

मुंबई,दि.23: Uddhav Thackeray On Ajit Pawar: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं आहे. आज (दि.23) बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेना वंचितची युती (Shivsena-VBA Alliance) जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी युतीची घोषणा केली.

एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये… | Uddhav Thackeray

‘आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं.

उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना फटकारलं | Uddhav Thackeray On Ajit Pawar

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज डॉ. आंबेडकर भवन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी जागावाटपावरून अजित पवार यांना फटकारलं.

वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार…

वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार. शेवटी कुणी किती जागा लढायच्या हे अजून ठरवायचे आहे. ते ठरल्यानंतर निर्णय घेऊ. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आम्ही एकमेकांना मदत केली. त्यामुळे नागपूरला सुद्धा अर्ज भरला होता तो मागे घेतला. नाशिकची जागा काँग्रेसला जागा सोडली. त्याने जे करायचं नाही ते केलं. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकली त्यांना सोडली होती. पण आमचा माणूस नाही असं म्हटलं नाही. आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं.

शरद पवार यांचं लौकीक तुम्हाला माहिती आहे…

अडीच तीन वर्षांपूर्वी आम्हाला ग्रहीत धरून राजकारण केलं होतं. शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. त्यावेळी मला सांगितलं की, शरद पवार यांचं लौकीक तुम्हाला माहिती आहे, कधी पण दगा देतील, हे मी जाहीर भाषणात सांगितलं. हे मी पाहत असताना माझ्याच लोकांनी दगा दिला. आता ऐकून जे राजकारण चाललंय, दुसऱ्याचं घर फोडून सत्तेत येणारी अवलाद गाडून टाकण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

याला कुणाची हरकत नाही

तेव्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, आमच्यावर अनेक आरोप झाले. पण आम्ही सगळ्या आरोपांना उत्तरं दिली. आम्ही अडीच वर्ष सरकार चालवून दाखवलो. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांचे हित सांभाळायचे, जर आपण एकत्र आलो नाही तर व्यक्तिरित्या काही फायदा होणार नाही. दोन पक्ष एकत्र आले आणि कुणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं म्हटलं तर हे देश प्रथम या हेतूला तडा जातो. आपण महाविकास आघाडीमध्ये आला आहात. घटक पक्ष म्हणून वाटचाल कराल याला कुणाची हरकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ही युती विजयी दिसणार आहे. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. मग जागावाटप असेल कसं काय असेल, तो आमचा प्रश्न आहे. आज सुद्धा माझं गद्दारांना आणि गद्दारांच्या बापजाद्यांना आव्हान आहे की, निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी शिंदेंना दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here