Mahadev Jankar: राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केले अनेक मोठे गौप्यस्फोट

0

सातारा,दि.12: Mahadev Jankar On BJP: राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. महादेव जानकर हे माढातून लढण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जानकर यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काल जानकर यांच्या जनस्वराज्य यात्रेचा माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण येथे समारोप झाला. यावेळी महादेव जानकर यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जानकर यांना कोणती ऑफर दिली होती? इथपासून ते मंत्रीपदाबाबतच्या अनेक नव्या गोष्टी उघड केल्या. तसेच आपलं लक्ष आता महाराष्ट्रात नसून दिल्लीकडे असल्याचंही महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.

मी कोणाशीही येणाऱ्या काळात युती… | Mahadev Jankar

माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली काल शुभारंभ झाला. फलटणच्या आंबेडकर चौकात येथे ही जनस्वराज्य यात्रा आली आणि तिचं रुपांतर छोटेखानी सभेत झालं. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय. जन स्वराज्य यात्रेचं सर्वच पक्षांनी माढा मतदारसंघात स्वागत केले आहे. याचा अर्थ माझा कोणीच शत्रू नाही. मी शत्रुत्व का स्वीकारत नाही? कारण मी कोणाशीही येणाऱ्या काळात युती करू शकतो, असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिला.

दबाव टाकला

मला स्वतःच्या ताकदीवर आता दिल्लीला जायचे आहे. माझे मन मुंबईत रमत नव्हते. मला दिल्लीला जायचे होते. माझ्यावर दबाव टाकून मला राज्यात मंत्री करण्यात आले, असा गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला.

मी भाजपला सुनावलं होतं | Mahadev Jankar On BJP

मागच्या लोकसभा निवडणुकीत काय झाले? याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण कमळ आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असं मी भाजपला सुनावलं होतं, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाव घेतात आणि ओबीसी मतावर निवडून येतात. मात्र हेच मोदी जातीनिहाय गणनेला विरोध करतात. जातीनिहाय जनगणनेला विरोध करणारे पंतप्रधान ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. जातनिहाय जनगणना सर्व समाजाची होणे गरजेचे आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यास प्रत्येक जातीची लोकसंख्या कळेल. आणि त्या प्रमाणात त्या जातीचा किती विकास झाला हे सुद्धा समोर येईल. जेव्हा हे सत्यसमोर येईल तेव्हा काँग्रेस आणि भाजपने कशी फसवणूक केली हे सुद्धा उघड होईल, असा दावाही त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here