लोकसभा निवडणूक दुसरा टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत झाले 50.93 टक्के मतदान

0

नवी मुंबई,दि.26: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 50.93% मतदान झाले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक 68.9 टक्के मतदान झाले. यानंतर मणिपूरमध्ये 68.5 मते पडली. यानंतर छत्तीसगडचा क्रमांक लागतो, जिथे दुपारी 3 वाजेपर्यंत 63.9 टक्के मतदान झाले. तर पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज (26 एप्रिल) 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांसाठी निवडणूक होत आहे.

या कालावधीत 15.88 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. यामध्ये 8.08 कोटी पुरुष, 7.8 कोटी महिला आणि 5,929 तृतीय लिंग मतदारांचा समावेश आहे. केरळमधील लोकसभेच्या सर्व 20 जागांवर निवडणूक होत आहे. कर्नाटकात 14, राजस्थानमध्ये 13, उत्तर प्रदेशात आठ, महाराष्ट्रात आठ, मध्य प्रदेशात सहा, आसाममध्ये पाच, बिहारमध्ये पाच, छत्तीसगडमध्ये तीन, पश्चिम बंगालमध्ये तीन आणि त्रिपुरा, मणिपूर आणि जम्मूमध्ये प्रत्येकी एक जागा आहे. काश्मीरमध्ये लोकसभेच्या 88 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मणिपूर बाह्य मतदारसंघांतर्गत काही विधानसभा मतदारसंघात मतदान झाले आहे, तर इतर विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. 

दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी आणि तिरुअनंतपुरममधून काँग्रेसचे शशी थरूर यांचा समावेश आहे. शशी थरूर हे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मथुरा येथील हेमा मालिनी, राजनांदगाव येथील भूपेश बघेल, बेंगळुरू ग्रामीण येथील डी. सुरेश आणि तेजस्वी सूर्या बेंगळुरू दक्षिणमधून निवडणूक लढवत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पप्पू यादव हे बिहारमधील पूर्णियामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे उमेदवार अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवत आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण मतदार राजाने मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे जे उमेदवार निवडून येतील ते कमी मतफरकाने असणार आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांमध्येही धाकधुक आहे. आज महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 43 टक्केच मतदान झाले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here