मुंबई,दि.20: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election News 2022) भाजपकडे सर्वाधिक 1,422 ग्रामपंचायती तर राष्ट्रवादीचे 987 ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.
भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष | Gram Panchayat Election News 2022
राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी झाली. या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी हा दुसरा स्थानावर आहे. तर शिंदे गटाने तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना ही पाचव्या स्थानावर आहे.

महाविकास आघाडीची कडवी टक्कर | Gram Panchayat Election Results 2022
राज्यात शिंदे आणि भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीहीने कडवी टक्कर दिली आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी झाली.

राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं होतं, आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने 1.422, राष्ट्रवादीने 987, शिंदे गट 709, काँग्रेसने 607 ठाकरे गट 571 तर इतर पक्षांनी 887 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. (Gram Panchayat Election Results 2022)
भाजप-शिंदे मविआला भारी | Gram Panchayat Election 2022
ग्रामपंचायती निवडणुकीत एकत्रित विचार करता भाजप आणि शिंदे गट हा महाविकास आघाडीला भारी पडल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे 2,473 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने 2,430 ठिकाणी विजय मिळवला. तसेच इतर आघाड्यांनी 1068 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. राज्यातील 616 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत.
राज्यातील ग्रामपंचायतींचं एकूण बलाबल
भाजप 1422
शिंदे गट 709
ठाकरे गट 571
राष्ट्रवादी 987
काँग्रेस 607
इतर 887
भाजप शिंदे गटाने एकूण 2473
मविआ 2430
इतर 1068
निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती – 7,682
एकूण सदस्य संख्या- 65,916 (त्यापैकी बिनविरोध विजयी सदस्य- 14,028).
निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा- 7,619 (बिनविरोध विजयी सरपंच- 699).
एकूण 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.