निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात, हा लोकशाहीचा खून आहे: चंद्रकांत खैरे

0

औरंगाबाद,दि.9: निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे, हा लोकशाहीचा खून आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून मागणी केली होती. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार आहेत.

एकनाथ शिंदेंचा मला भयंकर राग आलाय. या रिक्षावाल्याने इतके पैसे कुठून कमावले? शिवसेना फोडण्याचे काम केले. आनंद दिघे असते तर गद्दारी केल्यामुळे तुला उलटा टांगला असता. आनंद दिघेंच्या नावावर हे सगळं करतोय. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा भविष्यात विजय होणार आहे. ज्यांनी गद्दारी केली ते संपले हा इतिहास आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संतप्त भूमिका मांडली आहे. 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, माझ्या शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण कायम राहणार आहे. शिंदेंना धनुष्यबाण मिळू शकत नाही. केंद्रात मोदी सरकार आहे ते हे करणार असेल तर 2024 मध्ये जनता धडा शिकवेल. शिवसेना संपवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. आमच्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्याची जाण आम्हाला आहे. गद्दारांना नसेल. परमेश्वर तुम्हाला कधी माफ करणार नाही. संघर्ष, संकटे येतात पण शिवसेना संपली नाही. संपणार नाही. बाळासाहेबांवर अनेक संकटे आली होती असंही त्यांनी सांगितले.

तसेच आमच्यावर जे संकट आले आहे त्याचा सामना करणार आहोत. उद्धव ठाकरे हे संयमी आणि संघर्षमय नेतृत्व आहेत. त्यामुळे आम्ही संघर्ष करत राहू. एकनाथ शिंदे आणि 40 गद्दारांनी शिवसेना फोडण्याचं महापाप केले आहे. अनेक शिवसैनिक दुखावले गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा संघर्ष करू आणि जिंकून येऊ असा प्रण केला आहे असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. 

मी रात्रभर झोपलो नाही. देवा हे काय केलंस तू? बंदोबस्त कर देवा. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी ते संपणार आहेत. निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे. हा लोकशाहीचा खून आहे. अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणारच. साधा रिक्षावाला कोट्यवधी रुपये छापले. उद्धव ठाकरेंनी केवळ हात वर केला. याचे परिणाम भयानक होतील. भाजपा कुठेही दिसणार नाही. एकनाथ शिंदे संपणार आहे असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here