मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरूपौर्णिमानिमित ट्विट, बाळासाहेबांना अभिवादन

0

मुंबई,दि.13: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गुरूपौर्णिमानिमित ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांना अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांचे ट्विट

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो असून बाजूला “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन,” असं लिहिण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर सतत टीका होत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा युक्तिवाद करत आहेत.

“महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील निवडणुकीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं असतं. हिंदुत्व, सावरकर असो किंवा दाऊदचा विषय असो…आपल्याला उघडपणे बोलता येत नव्हतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली होती. बाळासाहेबांनी अन्यायाला वाचाव फोडा सांगितलं होतं. त्यामुळे हा बंड नसून अन्यायाविरोधातील उठाव आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here