नवी दिल्ली,दि.2: BJP Lok Sabha Plan: भाजपाने लोकसभा 2024 साठी प्लॅन बनवला आहे. चाय पे चर्चा नंतर आता टिफीन बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. यापूर्वी ‘चाय पे चर्चा’ भाजपाने (BJP) सुरू केली होती. भाजपाने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मोठ्या जाहीर सभेने सुरू झालेली ही मोहीम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरी देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप काम करणार आहे. तसेच, या मोहिमेद्वारे अशा लोकांना योजनांशी जोडले जाईल, जे काही कारणास्तव वंचित राहिले आहेत. (BJP Lok Sabha Plan)
टिफिन बैठकचे आयोजन करण्यात येणार | BJP Lok Sabha Plan
यासोबतच काही अनोखे प्रयोगही या मोहिमेत केले जात आहेत. जेणेकरून नाराज कार्यकर्ते व नेत्यांचे मन वळवून त्यांना पुन्हा सक्रिय करून त्यांचा निवडणुकीत वापर करता येईल. या अभिनव आणि आगळ्यावेगळ्या प्रयोगाला ‘टिफिन बैठक’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते 3 जून रोजी आग्रा येथून पहिल्या टिफिन बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. भाजपच्या प्रत्येक आमदार आमि खासदाराला या टिफिन बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा सोलापूर जिल्ह्यात अनोळखी संशयित व्यक्तिची ओळख पटल्याशिवाय राहण्यास परवानगी देण्यास बंदी
आपापल्या घरून स्वतःचा टिफीन आणावा लागेल
राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, तरुण चुग आणि विनोद तावडे यांना या मोहिमेचे प्रभारी बनवण्यात आले आहे. विधानसभा स्तरावर या बैठका होणार आहेत. यामध्ये आमदार, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे या सभेला उपस्थितांना आपापल्या घरून स्वतःचा टिफीन आणावा लागेल आणि सर्वजण एकत्र जेवतील आणि चर्चा करतील. यादरम्यान तक्रारी दूर करून आमदार, खासदार आपले कर्तृत्व सर्वांसमोर मांडतील.
नरेंद्र मोदींनी सुरू केली होती टिफिन बैठक!
गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिफिन बैठक सुरू केली होती. नरेंद्र मोदी दर महिन्याला अशा टिफीन बैठका घेत असत आणि त्यात आपल्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असत. जेवताना ते कधी-कधी कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायचे, त्यामुळे त्यांना अभिप्राय मिळायचा. यासोबतच सुशासनाच्या संदर्भात काही सूचनाही मिळाल्या आणि सरकार कसे काम करत आहे, याची माहितीही मिळत होती.