देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांचे मोठं विधान

0

मुंबई,दि.१५: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी (Bala Nandgaonkar) मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. जवळपास दीड ते २ तास या दोन्ही नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे उपस्थित होते. राज-फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे-भाजपा युतीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आलं. त्यात भविष्यकाळात राजकारणात काहीही होऊ शकतं अशाप्रकारे सूचक संकेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत.

भेटीनंतर बाळा नांदगावकर म्हणाले की, मध्यंतरी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं होतं. ते पत्र सगळ्यांनाच आवडलं होतं. त्या पत्रानंतर फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले होते. त्यानंतर आज ते सदिच्छा भेट घेण्यासाठी शिवतीर्थवर आले होते. १५-२० मिनिटं आम्ही दोन्ही नेत्यांसोबत होतो. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कळू शकेल. मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आम्ही माध्यमांकडूनच ऐकतो आहे. अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात घेणार यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. अशाप्रकारे वृत्त खोटं आहे. ही खोडसाळपणाचं होतं असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सरकारमध्ये समावेश असण्याचा आमचा संबंध नाही. आम्ही तशी काही मागणी केली नाही. पण दोघांमध्ये चर्चा झाली असेल तर माहिती नाही. राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. मनसे भाजपा युतीबाबत अनुत्तरीत आहे.

सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे भाष्य करू शकत नाही. सध्या राष्ट्रपती निवडणुका आहेत त्यात आमचं एकमत आहे. भाजपाला मदत करण्याची भूमिका मनसेने घेतली. आता त्याबदल्यात काय करायचे हे त्यांच्या पक्षाचं धोरण असेल. कुठल्याही मोबदल्यासाठी राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. आता मनसेला सकारात्मक वातावरण आहे. लोकांमध्ये सगळ्याच पक्षांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे. आमचा एकला चलो रे नारा आज, उद्याही राहणार आहेत. पण भविष्यात नक्की काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही असंही बाळा नांदगावकरांनी सांगितले. 

तसेच राजकारणात काहीही शक्य आहे. पुढील निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही. महाविकास आघाडी बनेल असंही वाटलं नव्हतं. त्यानंतर आता अशाप्रकारे सरकार बनेल असंही वाटलं नाही. लोकं सगळं काही बघत आहे. जनतेचा कौल डावलून आधीच सरकार बनलं होतं. येणारा काळ मनसेसाठी सुवर्णकाळ ठरेल असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here