दि.१ एप्रिल २०२२: america india: अमेरिकेने (America) भारताला (India) रशिया भारत मैत्री संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. रशिया युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अनेक देशांनी या युध्दाकरिता रशियाला (Russia) जबाबदार धरत रशियावर निर्बंध घातली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियावर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations General Assembly) युक्रेन आणि मित्र देशांनी रशियाविरोधात प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये सर्व देशांनी मतदान केले. भारताने (India) मात्र या मतदानापासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेने (America) रशियाच्यासंदर्भाने भारताबद्दल (India-Russia) एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारताने रशियासोबत व्यापार करु नये यासाठी अमेरिकेकडून बरेच प्रयत्न केले जात होते. त्यामुळे अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार दलीप सिंह (Daleep Singh) यांनी भारताला इशारा देताना चीन आणि रशियाच्या मैत्रीपासून सावध राहण्यास सांगितलंय. चीनने एलओसीचं उल्लंघन केलं तर रशिया भारताच्या बाजूने उभा राहील असा विचार करु नये असं दलीप सिंह (Daleep Singh) यांनी म्हटलं आहे.
रशिया आणि चीनमधील (Russia-China) मैत्रीचं नातं हे फार घट्ट असून हे दोन्ही देश मित्रराष्ट्र आहेत असं दलीप यांनी म्हटलंय. दलीप सिंह यांनी इशारा दिलाय की जर चीनने भारतावर हल्ला केला तर भारताने या भ्रमामध्ये राहू नये की त्यांचा जुना मित्र असणारा रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहील. कारण सध्या चीन आणि रशिया हे अधिक जवळ आलेत, असं दलीप सिंह यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय.
अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काही दिवसांमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्वाचं मानलं जात आहे. यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी त्यांची भेट घेतली आहे. या मुलाखतीनंतरच दलीप सिंह यांनी भारताने रशिया-चीन यांच्या मैत्रीची दखळ घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय.
अमेरिकन उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंह यांनी भारताने रशियाकडून तेल किंवा इतर गोष्टींसंदर्भात व्यवहार करताना घाई करु नये असं आमचं मत असल्याचं स्पष्ट केलंय. दलीप सिंह यांनी रशियासोबतचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय निर्बंधांमध्ये येतो. रशियाने युक्रेनवर गरज नसताना हल्ला केल्याने अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादलेत. सध्या भारत रशियासोबत करत असणारा व्यापार हा या निर्बंधांचं उल्लंघन करणारा असल्याचं दलीप सिंह यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय.
भारताचे परराष्ट्र सचीव हर्षवर्धन श्रृंगला यांनी वॉशिंग्टनमध्ये दलीप सिंह यांची भेट गेतली. दलीप सिंह हे जी-२० देशांच्या समुहासाठीही महत्वाची भूमिका बजावतात. दोन्ही अधिकाऱ्यांमधील चर्चेदरम्यान आर्थिक तसेच धोरणात्मक आघाड्यांवर सहकार्याबद्दल चर्चा झाली. एकमेकांचं हीत जपण्यासाठी जी २० सहीत जागतिक मुद्द्यावर एकत्र काम करण्यासंदर्भात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. जी २० चं २०२३ मधील संमेलन हे भारतात आयोजित केलं जाणार आहे.