पुणे,दि.१०: Ajit Pawar On NCP Anniversary | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपण काही साधू संत नाही असे म्हणत भाजपा बरोबर केलेल्या युतीवर भाष्य केले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले आहे. आज राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, आजही काहीजन विचारतात तुम्ही भाजपसोबत का गेलात ? आपण काही साधू संत नाही. भाजपा बरोबर केलेल्या युतीवर पवार यांनी भाष्य केले. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.

आपण काही साधू संत नाही | Ajit Pawar On NCP Anniversary
अजित पवार म्हणाले, स्वाभिमानातून राष्ट्रवादीची 10 जून 1999 रोजी स्थापना झाली. तेव्हापासून राज्यात आघाडी युतीचे सरकारं येत आहे. कुणालाही एकहाती सत्ता मिळालेली नाही. 2019 ला शिवसेनेसोबत सरकार केले त्यावेळेस तडजोड केली. मात्र, त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विरोधी पक्षात बसून आंदोलन करुन काही होत नाही. आपण साधू संत नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनहितासाठी आपण बेरजेचं राजकारण करणारे लोक आहेत.
देशाचा विकास झाला पाहिजे. राज्याचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे यामुळे एनडीए सोबत भाजपा सोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.