C R Patil | पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री सीआर पाटील यांचा मोठा निर्णय 

0
C R Patil | केंद्रीयमंत्री सीआर पाटील

सोलापूर,दि.४: C R Patil | पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) केंद्रीयमंत्री सीआर पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तान सीमेवर आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची मागणी केली आहे. आता केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांनी सुरतमधील एका कार्यक्रमादरम्यान पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, ‘जोपर्यंत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जात नाही तोपर्यंत मी स्वागत पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही.’

C R Patil | पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री सीआर पाटील यांचा मोठा निर्णय 

केंद्रीयमंत्री आणि जलशक्ती मंत्री सीआर पाटील शनिवारी गुजरातमधील सुरत येथे झालेल्या गुंतवणूकदार परिषदेत पोहोचले. यादरम्यान, जेव्हा त्यांना स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देण्यात आला तेव्हा त्यांनी तो घेण्यास नकार दिला. त्यांनी कोणतेही स्मृतिचिन्ह देखील स्वीकारले नाही.

सीआर पाटील यांचा मोठा निर्णय 

केंद्रीय मंत्र्यांच्या या निर्णयाची घोषणा कार्यक्रमाच्या आयोजकांनी केली. व्यासपीठावरून हे जाहीर करताना ते म्हणाले, “जलशक्ती मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे की पहलगाम हल्ल्याचा बदला घेईपर्यंत ते स्वागतासाठी पुष्पगुच्छ किंवा कोणतेही स्मृतिचिन्ह स्वीकारणार नाहीत.” हे ऐकून प्रेक्षकांनीही जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

C R Patil | केंद्रीयमंत्री सीआर पाटील
केंद्रीय मंत्री सीआर पाटील

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जलशक्ती मंत्री सीआर पाटील म्हणाले होते की, भारताने पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळू नये याची काळजी घ्यावी.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here