सोलापूर,दि.28: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचे आभार मानले आहेत. मुस्ती ग्रामपंचायतचे सरपंच नागराज पाटील व उपसरपंच रमेश चव्हाण यांनी स्वाक्षरी करून पत्र लिहून काळजे यांचे आभार मानले आहेत. सोलापूर जिल्हयातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हरणी नदी वरती पुल मंजूर व्हावे या करीता मुस्ती ग्रामस्थाच्या वतीने आजतागायत मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींकडे अनेक वेळेस निवेदने दिलेली होती.
याच अनुषंगाने राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुस्ती ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यानी या नदीवरील पुलाचे गांभीर्य ओळखून सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या व या कार्याची जबाबादरी जिल्हाप्रमुख म्हणून मनीष काळजे यांना दिली होती. त्यानुसार काळजे यांनी मुस्तीगावास भेट देवून नदी पात्राची पाहणी केली.
ग्रामस्थांनी लिहिल्या आभार पत्रकात म्हटले आहे की, त्याचे गांभीर्य आपण (मनीष काळजे) मुख्यमंत्र्याना सांगितलात. त्यामुळेच हरणी नदीवरील पुलाच्या बांधकामा करीता शासनाने 7 कोटी 70 लाख रुपये मंजूर केले, असून लवकरच या पुलाचे काम सुरु होईल व या भागातील शेतकरी, कामगार व नागरीक यांची काळजी मिटेल यात शंका नाही. आपल्या या प्रयत्ना बद्दल मुस्ती ग्रामस्थानच्या वतीने आपले लाख लाख आभार. भविष्यात अशाच प्रकारच्या सहकार्याचे आपणाकडून अपेक्षा आहे. असे मुस्ती ग्रामपंचायतीच्यावतीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या आभार पत्रकावर सरपंच व उपसरपंच यांनी सह्या केल्या आहेत.