ट्रक कारचा अक्कलकोट तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात ३ ठार

0

सोलापूर,दि.२३: अक्कलकोट तालुक्यात ट्रक-कारचा झालेल्या भीषण अपघातात ३ ठार झाल्याची घटना घडली आहे. आळंदीहून इंडिकडे भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या फरशीच्या ट्रकला शिरवळजवळ (ता. अक्कलकोट) जोरात धडक बसली. त्यात एका चिमुकल्यास दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गौर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मृतांची ओळख पटवली जात आहे. राजेंद्र गौर हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.

वागदरीवरून फरशी घेऊन सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला इंडिकडे जाणाऱ्या चारचाकीने समोरून धडक दिली. दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आहे. चारचाकीचा वेग खूप होता. रस्ता मोठा असतानादेखील कारचालकाचा ताबा सुटला आणि सरळ कार ट्रकला धडकली.

त्यात कार चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गौर, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कोळी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. अतिवेग व सलग ड्रायव्हिंग हेच अपघाताचे कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here